१० महिन्यात २० गुंठ्यात ३० टन ऊस २६०० रू. ने गुऱ्हाळाला, दुष्काळात वाढे गुरांना !

श्री. मदनलाल चांदमल मुथा,
मु. पो. उरळगाव, ता. शिरूर, जि. पुणे.
मोबा. ९८९० ९२४९२९


ऊस २० गुंठ्यामध्ये जुलै २०१२ ला एक डोळा पद्धतीने लावला होता. जमीन पूर्ण खडकाळ असून पाणी विहीरीचे भरपूर आहे. शेणखत प्रत्येकवेळी भिजवताना पाण्यामध्ये कालवून देतो. कल्पतरू खताच्या ६ गोण्या वापरल्या. लागवडीच्यावेळी २ आणि दोन्ही खुरपणीच्यावेळी २ - २ गोण्या कल्पतरू वापरले. दुसरी खुरपणी झाल्यावर ३ महिन्याचा ऊस असताना वरखत १०:२६:२६ ची १ गोण दिली.

जर्मिनेटर २ वेळा १ - १ लि. २०० लि. पाण्यातून सोडले होते. घरी २५ गाई आहेत. हा ऊस गायांना उन्हाळ्यात चारा कमी पडू नये म्हणून केला होता. परंतु गाईंना ऊस घालण्याची वेळ आली नाही.

एवढ्यावर १० महिन्याचा (२५ मे २०१३ ला ) ऊस २२ -२४ कांड्यांचा होता. तेव्हा गुऱ्हाळाला २६०० रू. टनाने रोख दिला. वाढे गुरांसाठी ठेवले. तर २० गुंठ्यात ३० टन उत्पादन मिळाले.

आज रोजी या उसाच्या खोडव्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी घेऊन जात आहे. संत्रा ४०० झाडे ६ वर्षाची आहेत. त्याचा बहार धरणार आहे. त्यासाठी सप्तामृत घेऊन जात आहे.