पंचामृतामुळे टोमॅटो व कांद्याला अधिक भाव

श्री. सोमनाथ गेणू नेहे,
मु.पो. सावरगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर


टोमॅटोची जून महिन्यात लागवड केली होती. लागवडीचे अगोदर ५० किलो कल्पतरू खत टाकले. पंचामृत औषधे मे. पवार ब्रदर्स अकोले यांचेकडून १ लि. चा डोस घेऊन गेलो होतो. त्याची फवारणी लागवडीनंतर १५ दिवसांनी केली. या फवारणी मुळे झाडांची वाढ होऊन झाडांवर काळोखी आली. नंतर पुन्हा २१ दिवसांनी याच औषधांची फवारणी केली तर आमचे शेजारचे प्लॉटवर लाल कोळी आला होता. त्यामुळे त्यांचे उत्पादनात घट येऊन प्लॉट लवकर संपला, तर आमच्या प्लॉटवर लाला कोळी अजिबात आला नाही. तसेच इतर कुठलाच रोग आला नाही. कल्पतरू खतामुळे जमीन भुसभुशीत होऊन ओलावा टिकून राहिला. त्याचा फायदा झाडांची वाढ व फुटवा होण्यासाठी झाला. माल लागवडीनंतर पावणेदोन महिन्यात चालू झाला. २५ किलो वजनाच्या २५०० जाळ्या निघाल्या. टोमॅटो अजून महिनाभर चालेल. तोडा आठवड्यातून ३ वेळा करतो. टोमॅटो संगमनेर मार्केटमध्ये विकतो. जाळीला सुरुवातीला बाजारभाव ६० - ८० रु. मिळाला. आत सध्या १०० रु. मिळत आहे. या प्लॉट पासून १ लाख रु. उत्पादन मिळाले. खर्च २० - २२ हजार रुपये झाला.

कांदा - दीड एकर कांद्यासाठी लागवडीनंतर १ महिन्यांनी पंचामृताची एक फवारणी केली होती. या फवारणीमुळे कांद्याला कलर येऊन पत्ती कडक बनते. त्यामुळे बाजरी चांगले मिळतात. कांद्याची विरळणी करून १९ पिशवी (५० किलोची) पुणे मार्केटला आणली होती. तर त्याला ९२० रु. क्विंटल भाव मिळाला. अजून १५० पिशव्या माल निघेल. आता नवीन २ - ३ गुंठे कांद्यासाठी कल्पतरू १० किलो घेऊन जात आहे. पंचामृत औषधे मे. पवार ब्रदर्स अकोले (अ.नगर) यांचेकडून घेऊन फवारणी करणार आहे.