२८ एकरातील विविध फळ झाडांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कल्पतरू

श्री. दिवाकर माधवराव सराफ,
मु.पो. लोहगाव, ता.जि. परभणी,
फोन : ०२४५२- २२०३२१


रोगट पपईची झाडे ९ व्या दिवशी पूर्ण निरोगी

तैवान ८७६ पपईची लागवड सात एकरमध्ये ८' x ८' वर १६ जुलै २००७ रोजी केली होती. जमीन मध्यम ते भारी असून पाणी पाटाने देत. या पपईला लागवडीच्या वेळी रासायनिक खते शेणखतासह दिली होती. २॥ महिन्याची पपई २॥ फुट उंचीची झाल्यावर २ - ३ झाडांची शेंड्याकडील पाने आकसू लागली. रोगाचे निदान होण्यापूर्वीच २ - ३ दिवसात त्याचे प्रमाण झपाट्याने वाढून १५ - २० झाडे निस्तेज दिसू लागली. गावातील लोक म्हणाले ही रोगट झाडे उपटून नष्ट करा.

या अवस्थेत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, पुणे येथे सरांना फोन करून परिस्थितीचा आढावा दिला, त्यावर सरांनी सप्तामृत औषधांचा पपईला प्रतिकुल परिस्थितीत कसा उपयोग होतो ते सांगितले. मी सप्तामृत औषधे माझ्याकडे असलेल्या २८ एकर क्षेत्रातील आंबा, मोसंबी, सीताफळ, केळी , अंजीर, चिंच या फळबागेला वाढीसाठी वापरत होतोच, त्यामुळे या औषधांचा रिझल्टही आला होता.

त्यावेळी या मोठ्या क्षेत्रासाठी २ - २ लिटर सप्तामृत घेऊन गेलो होतो. त्यातील औषध शिल्लक असल्याने सरांशी पपईसंदर्भात फोनवर बोलणे झाल्याप्रमाणे लागलीच सप्तामृत औषधांची ३ दिवसांच्या अंतराने तीन वेळा रोगग्रस्त झाडांवर दाट फवारणी घेतली. तसेच इतर क्षेत्रावरही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक फवारणी त्यावरही घेतली. ३ - ३ दिवसांनी ३ फवारण्या केल्यावर ९ व्या दिवशी पाने पुर्ण १०० % रुंद व टवटवीत झालायचे आढळले. त्यामुळे रोगग्रस्त झाडे उपटून टाकण्याचा संबंधच आला नाही. नंतर १० दिवसांनी एक आणि १५ दिवसांनी एक अशा २ फवारण्या घेतल्या. तेवढ्यावर प्लॉट शेवटपर्यंत निरोगी राहून उत्पादन चांगले मिळाले.

केशर आंब्याची १२०० झाडे ५ वर्षापुर्वीची आहेत. त्याचा आता आंबेबहार धरला आहे. त्याची मोहोर गळ होऊ नये. तसेच फळांचे पोषण चांगले होण्यासाठी फळे काढणीपर्यंत फवारणीसाठी सप्तामृत औषधे ५ - ५ लि. आणि कल्पतरू सेंद्रिय खत एक टन घेऊन जात आहे. यातीलच पपईलाही वापरणार आहे.