डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केळीचे कमळ ५।। महिन्यात, १२ महिन्यात सर्व काढणी पूर्ण

श्री. भागवत सिताराम लोखंडे,
(शांतीसागर कृषी सेवा केंद्र) मु. पो. चिनावल, ता. रावेर, जि. जळगाव.
मोबा. ९७६७४७८५४५


२५ एप्रिल २०१३ रोजी आम्ही केळीची २।। एकरमध्ये लागवड केली. जमीन भारी काळी असून पाणी विहीरीचे भरपूर आहे. प्रथम कंद जर्मिनेटर आणि प्रोटेक्टंटच्या द्रावणात बुडवून ते ५ x ५ फुट अंतरावर नांगराने सरी पाडून लावले. तर नेहमीच जर्मिनेटरमुळे उगवण अधिक प्रमाणात होऊन कोंब जोमाने वाढीस लागला. त्यानंतर दर महिन्याला सप्तामृताच्या ३ फवारण्या केल्या. ही उन्हाळी लागवड असल्याने लागवडीच्यावेळी खतांची मात्रा दिली नाही. या तीन फवारण्या सुरूवातीच्या ३ महिन्यात झाल्यावर १ ट्रॅक्टर शेणखतामध्ये २५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत मिसळून प्रत्येक खोडास २- २ किलो खत दिले. एवढ्यावर केळीची ग्रोथ उत्तम होऊन अवघ्या ५।। महिन्यात केळी निसवून कमळ बाहेर पडले. सप्टेंबरमध्ये कमळ निघाल्यानंतर केळी थंडीच्या कालावधीत येऊनदेखील लवकर पोसली.

या केळीची एप्रिल २०१४ मध्ये काढणी सुरू केली आणि मी च्या सुरूवातीपर्यंत काढणी पूर्ण झाली. १८ ते २२ किलोपासून २५ किलो पर्यंतचे घड मिळाले. सरासरी २० ची रस मिळाली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केळीचा वाधा (लांबी) वाढला होता. २।। एकरातून एकूण ५० टन माल निघाला. सुरूवातीच्या केळीस १२०० ते १३०० रू./क्विंटल भाव मिळाला. तर शेवटी राहिलेला १०० क्विंटल माल ७०० रू. ने गेला. सर्व मालाची जागेवरून विक्री झाली. ज्या शेतकऱ्यांनी जी - ९ केळीची रोपे लावली होती आणि त्यांना आपल्या शांतीसागर कृषी सेवा केंद्रातून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे दिली, त्यांना २२ ते २५ किलोची रास मिळाली.

९ महिन्यात उत्कृष्ट हळद

केळीच्या वेळी २७ मे २०१३ ला ३ एकर हळद लावली. हळदीचे बेणे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून लावल्यामुळे १५ दिवसात रांगा (उगवण स्पष्ट )दिसू लागल्या. ५ फुटाचा पट्टा सोडून १।। फुट रुंदीचा वरून सपाट वरंभा (भोत) केला. त्यामधून पट्टी ड्रीप केली आणि पट्टी ड्रिपच्या दोन्ही बाजूस ५ - ५ इंच अंतरावरून समांतर २ ओळी करून ९ - ९ इंचावर लागवड केली. सप्तामृत १ - १ महिन्याच्या अंतराने ३ वेळा फवारले आणी उगवण झाल्यानंतर २।। महिन्यांचा प्लॉट असताना ३ एकराला १७ पोती कल्पतरू सेंद्रिय खत दिले.

डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे ९ महिन्यात म्हणजे १ महिना अगोदर हळद काढणीस आली. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने पिकांवर रोग किडीचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे रासायनिक किटकनाशके, बुरशीनाशके फवारणीचा खर्च वाचतो, तसेच हळदीचे गड्डे चांगले पोसले जातात.

३ एकरात हळदीचे ३ लाख ९२ हजार तर ५० क्विंटल बेण्याचे १।। लाख शिवाय घरच्यासाठी ६० क्विंटल बेणे

३ एकरातून कोरडी (पॉलीश न केलेली) हळद ६० क्विंटल मिळाली. काढणीनंतर प्रथम बॉयलरमध्ये उकडून १५ दिवस पटांगणार १० ते १२ दिवस वाळवून ६० क्विंटल पैकी ५६ क्विंटल सांगली मार्केटला ७००० रू./क्विंटल भावाने विकली. या बरोबरच ११० क्विंटल बेणे मिळाले. त्यातील ५० क्विंटल बेणे शेतकऱ्यांना ३० रू. किलो भावाने विकले व ६० क्विंटल बेणे घरच्यासाठी ठेवले आहे.

७ एकर कलिंगडाचे २।। महिन्यात २ लाख तर त्यातील केळीचे २ महिन्याचे आंतरपीक उन्हाळ्यातही जोमदार

रावेर येथील शेख रिजवाल शेख रमजान (मोबा. ९१७५२८७७८६) यांनी ७ एकर टरबुज (कलिंगड) १४ - १५ फेब्रुवारी २०१४ ला ५ x २ फुटावर लावले होते. या टरबुजामध्येच १ महिन्याने म्हणजे १५ मार्च २०१४ रोजी केळीच कंद लावले. या दोन्ही पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे वेळापत्र काप्रमाणे नियमित फवारे घेतले. टरबुजाला सप्तामृताच्या एकूण ४ फवारण्या व ७ एकराला १४ बॅगा कल्पतरू सेंद्रिय खत वापरले. त्यामुळे टरबुजाची जोमाने वाढ झाली. २।। महिन्यात कलिंगड काढणीस आले. मे च्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण टरबुजाची काढणी झाली. तर ३० टन उत्पादन मिळाले. या कलिंगडाची फळे सुरुवातीला ८ ते १० किलो वजनाची मिळाली ती ८ रू. किलो भावाने गेली. शेवटचा माल ५ रू. किलोने विकला गेला. असे ७ एकरातून २ लाख रू. उत्पन्न मिळून केळीचे आंतरपीक सध्या २ महिन्याचे पूर्ण वाढीच्या अवस्थेत आहे. याला आजपर्यंत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताच्या २ फवारण्या झाल्या असून झाडे गुडघ्याला लागत आहेत.

मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे टोमॅटो, भरताची वांगी, कांदा, तरकारी पिकांना देतो. तर नेहमीच्या पारंपारिकतेपेक्षा उत्पादन व दर्जात वाढ होत असल्याचे शेतकरी सांगतात. येदलाबाद (मुक्ताईनगर) येथे आल्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले आहे.

नुसत्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे २।। एकर कापसाची नागअळी जाऊन फरदडसह उत्पन्न ५० क्विंटल

आम्ही केळी, हळदी बरोबरच कापसाला देखील हे तंत्रज्ञान वापरले आहे. तर गेल्यावर्षी २।। एकर बागायती कापसाचे फरदडीसह ५० क्विंटल उत्पादन मिळाले. कापसावर नागअळीचा प्रादुर्भाव झाला होता, तो डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या नियमित फवारण्यांनी आटोक्यात आला. या कापसाला सप्तामृताच्या ३ फवारण्या व कल्पतरू सेंद्रिय खताच्या ७ बॅगा दिल्या होत्या. या व्यतिरिक्त इतर काहीच वापरले नाही. सध्या नवीन केळी बागेला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरात आहे.