डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी - आंबा/काजू/नारळ/लिची/फणस

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर



आंबा

* दरवर्षी फळे लागतात. सर्व झाडांना मोठ्या प्रमाणात मोहोर लागतो.

* मोहोरगळ होत नाही. मावा, तुडतुड्यांपासून मोहोराचे संरक्षण होते.

* काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव आटोक्यात राहतो.

* आंब्यामध्ये विषारी वजनात वाढ होते. फळांना आकर्षक चमक येते.

* आंब्यामध्ये विषारी अंश येत नाही. साका होत नाही.

* फळात रसाचे प्रमाण वाढून गोडी वाढते. फळांचा दर्जा सुधारल्याने टिकाऊपणा वाढतो. त्यामुळे मागणी वाढते.

* फळे मोठ्या प्रमाणावर निर्यात करता येतात.

* एकूण उत्पादनात वाढ झाल्याने तसेच भाव जादा मिळाल्यामुळे उत्पन्नात भरीव वाढ होते.

काजू

* काजू बियांची उगवण लवकर व चांगली होती.

* सर्व झाडांना मोठ्या प्रमाणात काजू लागतात.

* काजूची गळ होत नाही.

* एरवी सुरुवातीस लागलेले काजू मोठे होतात, मात्र नंतर लागलेले शेंड्याकडील काजू लहान राहतात. येथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत लागलेले काजू एकसारखे, मोठे, वजनदार, दर्जेदार मिळतात.

* काजूचा टिकाऊपणा वाढतो. त्याची पौष्टीकता वाढते. उत्तम क्वॉलिटीचा काजू मिळाल्याने त्याला भाव जादा मिळतो.

* उत्पादन व भावात वाढ म्हणजे आर्थिक नफ्यात हमखास वाढ होते.

नारळ

* फुलोऱ्याचे घुमारे जोमाने निघतात. फळगळ होत नाही.

* दरवर्षी मोठ्या प्रमाणात नारळ लागतात.

* नारळाच्या गराची जाडी वाढल्याने गर जास्त मिळतो.

* गराची गोडी वाढते. शहाळ्याचे पाणी चविष्ट व गोड मिळते.

* सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे नारळ आकाराने मोठे मिळतात.

* नारळाचे प्रक्रिया प्रदार्थ चांगल्याप्रकारे होऊन त्यांचा टिकाऊपणा वाढतो.

लिची

* लिचीची फळे ही एरवी मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर तयार होतात. तर या पावसात फळे सापडल्याने सडतात, नसतात. त्यामुळे प्रचंड नुकसान होते. अशावेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी सुरुवातीपासून वापरल्याने मोसमी पावसाच्या अगोदर फळे मार्केटला येऊन निर्यातक्षम उत्पादन मिळते.

* झाडावर मोठ्या प्रमाणात फळे लागतात. फळांचा आकार, रसाचे प्रमाण वाढून दर्जा सुधारतो व टिकाऊपणा वाढतो.

फणस

* फळे लवकर व मोठ्या प्रमाणात लागतात.

* मध्यम ते मोठ्या आकाराची फळे मिळतात.

* बियांचा आकार लहान व गर जाड, गोड, उत्कृष्ट स्वादाचा, खुसखुशीत व आकर्षक रंगाचा मिळतो.

* प्रक्रिया पदार्थाचा उदा. फणसपोळी, वेफर्स/चिप्स, पापड, पाकवलेले फणसाचे गर, फणसगराची पावडर, बियांची पावडर यांचा दर्जा सुधारून भाव जादा मिळतो.